Mewani-Modi.
Mewani-Modi. 
विश्लेषण

मोदींची उपाय योजनांपेक्षा भाषणबाजीच जास्त : जिग्नेश मेवानी 

सरकारनामा

मुंबई  : "देशातील नागरिकांचे प्रश्‍न वाढत चालले आहेत. त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भाषणबाजी करीत सुटतात. त्यांची भाषणबाजी म्हणजे केवळ जुमल्यांचा बाजार आहे', अशी टीका आमदार जिग्नेश मेवानी यांनी बुधवारी (ता. 15) येथे केली.

'तिरंगा उठाव भाजप हटाव' या रॅलीसाठी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी मुंबईत आले होते. शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून चैत्यभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. 'लोकांचे दोस्त' या संघटनेकडून हा कार्यक्रम घेण्यात आला.

 या वेळी मेवानी म्हणाले की," आज देशात अनेक समस्या आहेत; मात्र सरकार काहीही करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतात; मात्र देशासमोर असलेल्या प्रश्‍नांवर काहीही बोलत नाही. शेतकरी आत्महत्या, तसेच दोन कोटींना रोजगार, कुपोषण, कामगारांचे प्रश्न यावर मोदी काही बोलत नाहीत. भाषणात जुमलेबाजी सुरू आहे. लोकांनी प्रश्‍न विचारले, तर गोहत्येचा मुद्दा समोर आणला जातो."

" मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या असत्या, तर आरक्षणासाठी लोकांना आज रस्त्यावर उतरावे लागले नसते," अशी टीका या वेळी मेवानी यांनी भाजप सरकारवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT