विश्लेषण

सरकारच्या कामगार धोरणावर शरद पवार यांची टीका

सुजीत गायकवाड

नवी मुंबई : मार्केट कायदा बदलत चालला आहे. ही कामगारांसाठी धोक्याची बाब आहे. राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली असून, हे गंभीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सरकारवर कामगार धोरणावर शरद पवार यांनी जोरदार टीका केली. नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, की सरकार मार्केट कायदा रद्द करण्याच्या प्रयत्नात आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जगात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत असून त्याची झळ सर्व सामान्य कुटुंबाला सोसावी लागत आहे. याचा आपण विचार करायला हवा आपण जागरूक व्हायला हवे. राज्यातील कामगार संकटांच्या वेळेला उभे राहतात. मला माहित आहे. यावेळीला ही ते असेच उभे राहतील याची मला खात्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT