विश्लेषण

धरण फोडल्याचा खेकड्यांवर ठपका... हे तर सेना आमदाराला वाचविण्याचं कारस्थान : नवाब मलिक

सरकारनामा ब्यूरो

पुणे : तिवरे धरण खेकड्यांनी फोडले, असा दावा केल्याने जलसंधणारण मंत्री तानाजी सावंत यांच्यावर विरोधकांनी हल्ला बोल केला आहे. भ्रष्ट व मोठे मासे वाचवण्यासाठी सावंत, असे विधान करत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी म्हटले आहे. सावंत यांच हे निर्लज्ज समर्थन असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

कंत्राटदार आणि आमदारांना पाठिशी घालण्याचं काम तानाजी सावंत करत असल्याची टीका त्यांनी केली. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. निर्लज्ज समर्थन तानाजी सावंत यांनी केलं आहे असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

या धरणाचे काम शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने केल्याचे उघड झाले आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी चव्हाण यांना आधीच क्लिनचिट दिली आहे.

खेकड्यांचं कारण देऊन जलसंधारण मंत्री कंत्राटदाराला वाचवू पाहात आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आता हे सरकार महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणांवरचे खेकडे शोधणार का, असाही प्रश्न विजय वडेट्टीवर यांनी विचारला आहे.

खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा तानाजी सावंत यांनी केला होता. आपल्याला असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती असे तानाजी सावंत यांनी म्हटले. ज्यानंतर आता त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टीका केली आहे.

चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याने २३ जण वाहून गेले त्यापैकी १८ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून शोध कार्य आणि बचाव कार्य सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT