विश्लेषण

शिवसेना-भाजपमध्ये मध्यस्थी करण्यास वेळ नाही : नितीन गडकरी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. ही युती टिकली पाहिजे. भाजप शिवसेनेबरोबर युती करण्यास तयारच आहे अशी माहिती केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यापाठोपाठ गडकरी यांनीही शिवसेनेशी युती राहिली पाहिजे असे म्हटले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गडकरी यांना पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली. 

पालघरच्या शिवसेना-भाजपमधील तणाव ताणले गेले आहेत. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की शिवसेना-भाजपची गेल्या अनेक वर्षापासून युती आहे. ती हिंदुत्वाच्या मुद्यावर टिकली आहे आणि ती टिकली पाहिजे. लग्न झाले की नवरा बायकोमध्ये भांडणे होतात. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था आहे. त्यामुळे युती टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केली आहे. युतीतील तणाव दूर करण्यासाठी मध्यस्थी करणार का ? असे विचारता ते म्हणाले, की मी कामात व्यस्त आहे. मला मध्यस्थी करण्यास वेळ नाही. पण, पक्षाने सांगितल्यास ती तयार आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT