विश्लेषण

आमच्या कामामुळे विरोधक हैराण - मोदी

सरकारनामा ब्युरो

पुणे - आमच्या कामामुळे विरोधक हैराण झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जळगावातील सभेत बोलताना सांगितले. 

मोदी यांनी आज महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. स्थिर, स्वस्छ, संवदेनशील, `सबके साथ सबका विकास' करणारे फडणवीस सरकार आहे. फडणवीस सरकारने नव्या रस्त्यावरून विकासाला गती दिली. रस्त्यांपासून सिंचनापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये ही प्रगती होत आहे. त्यामुळे आमच्या कामामुळे विरोधक हैराण झाले आहेत. 

महाराष्ट्राचे स्वप्न आणि युवकांच्या आकांक्षा विरोधक पूर्ण करू शकणार नाहीत. त्यामुळे फडणवीस सरकारला पुन्हा निवडून आणूया, असे आवाहनही मोदी यांनी केले.

हिंमत असल्यास विरोधकांनी आम्ही रद्द केलेले 370 कलम आणि 35 अ कलम पुन्हा आणावे, असेही आव्हान मोदी यांनी विरोधकांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT