विश्लेषण

समाजाच्या हितासाठी मी भाजपमध्ये आलोय - गोपीचंद पडळकर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : धनगर समाजाच्या हितासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, समाजाच्या हितासाठीच मी त्यावेळी पक्षातून बाहेर पडलो होतो, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने न्यायालयात योग्य तो प्रतिज्ञापत्र दिल्याने समाजाचे 70 टक्के काम झालेले आहे आता उरलेले का महे सरकार करेल असा मला विश्‍वास आहे असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले. आज मुंबईत झालेल्या समारंभात पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजप सोडून वचिंत बहुजन आघाडीत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली होती. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पडळकर यांचे खूप कौतुक केले. पडळकर यांनी कुठलीही राजकीय मागणी केलेली नाही त्यांनी समाजासाठी मागणी केली आहे. त्यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला, त्यावेळी त्यांचे मन वळवण्याचा मी खूप प्रयत्न केला होता. ते पक्षात परत आल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे असेही त्यांनी सांगितले. 
भाजपच्या आजच्या कार्यक्रमात सहा आमदार प्रवेश करणार अशी हवा होती पण तसे घडले नाही, केवळ गोपीचंद पडळकर आणि कॉंग्रेसचे नेते काशीराम पावरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT