PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

पंजाबची विधानसभा निवडणूक, गुरू नानक जयंती अन् मोदींचा यू-टर्न

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कृषी कायद्यांवर यूृ-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मोदींनी हे कायदे मागे घेण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. पंजाबची (Punjab Assembly Election) विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी ही घोषणा करण्याला नेमका गुरू नानक जयंतीचा मुहूर्त निवडल्याची चर्चा आहे.

मोदींनी ही घोषणा करण्यासाठी शीखांचे पहिले गुरूंची जयंती निवडली. याचबरोबर दोनच दिवसांपूर्वी मोदी सरकारने कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील गुरूद्वारा दरबार साहिब कर्तारपूरचा मार्ग पुन्हा शीख भाविकांसाठी खुला झाला आहे. यातच मोदींनी आज कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य आहे. परंतु, काँग्रेस सोडलेले माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हाताशी धरून भाजप राज्यात जोरदार एंट्री करण्याच्या तयारीत आहे. त्याचीच प्रचिती आज मोदींच्या निर्णयातून आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. या उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळावी, उत्पादनाची योग्य किंमत, पर्याय मिळावेत. अनेक वर्षांपासून ही मागणी होती. आधीही अनेक सरकारांनी यावर मंथन केले होते. या वेळीही संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असले. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तीनही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ, असे आवाहनही मोदींनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT