राजू शेट्टी म्हणतात, "शेतकऱ्यांची खरी जाण शरद पवारांना'! 
राजू शेट्टी म्हणतात, "शेतकऱ्यांची खरी जाण शरद पवारांना'!  
विश्लेषण

राजू शेट्टी म्हणतात, "शेतकऱ्यांची खरी जाण शरद पवारांना'! 

सरकारनामा ब्युरो

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सर्वांत कठोर टीकाकार म्हणून ओळख असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी "शरद पवार हे शेतकऱ्यांची खरी जाण असणारे नेते' असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हटले आहे. भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न चालवले असतानाच शेट्टी यांनी हे मत नोंदविल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

परिवर्तन युवा परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांतून शेट्टींना प्रश्‍न विचारण्यात आला, "शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची खरी जाण कोणाला आहे, मोदींना की शरद पवारांना' ? उत्तरादाखल शेट्टी यांनी पवारांचे नाव घेताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. शेट्टी पुढे म्हणाले,"पवार सत्तेत असताना बारामतीत जाऊन आम्ही आंदोलने केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावातही आंदोलन केले. नरेंद्र मोदी यांनी चुकीचे निर्णय घेतले तर त्यांच्या गावातही आंदोलन करू. मी सत्तेत असलोतरी सत्तेचा गुलाम नाही.' 

राजकारण ही गटारगंगा आहे असे म्हटले जाते. जर गटारगंगा असेलतर त्यात हात घालून साफ करण्याची तयारी युवकांनी ठेवली पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT