विश्लेषण

अमरनाथ यात्रेवरचा हल्ला  म्हणजे देशावरचा हल्ला 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. त्यामुळे त्याबाबत केवळ निंदा करण्याची नव्हे तर चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. 

ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. "" सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदीने काहीच फरक पडला नाही. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा बंदोबस्त करायला हवा. केंद्रातील भाजप सरकारने याला चोख उत्तर द्यायला हवे. चर्चेपेक्षा हल्ल्याचा बदला घ्या. या देशातील 80 कोटी हिंदूंचा वाली कोण? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. 

1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगताना राऊत म्हणाले, "" 1996 साली अमरनाथ यात्रेवर संकट होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे, तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असे ठणकावले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती. तशीच भूमिका घेण्याची वेळ आली आहे असल्याचे राऊत यांनी शेवटी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT