विश्लेषण

मतदान करून शरद पवार लगेच दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले.  त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते. 

पवार यांनी चार एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत राज्यात प्रचाराचा धुमधडाका लावला. मोदी सरकारला हरविण्यासाठी मी चार एप्रिलपासून घर सोडल्याचे ते प्रचारात सांगत होते.  निवडणूक दौऱ्यात 27 एप्रिलपर्यंत 79 सभा त्यांनी घेतल्या. प्रचार संपल्यानंतर काल 28 एप्रिल रोजी एक दिवस ते दौऱ्यातून त्यांनी विश्रांती घेतली. तरी आज मतदान होणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील स्थितीचा आढावा ते काल उशिरापर्यंत घेत होते. आज सकाळी  मतदान करून ते सोलापूर आणि उस्मानाबादच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. 

``प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीची भीषण दाहकता लोक पवारसाहेबांना सांगत होते. परिस्थितीची पाहणी करायला मी येईन असं आश्वासन साहेबांनी त्यांना दिलं होतं. आज मतदान झाल्यावर जराही न थांबता ते सोलापूर आणि उस्मानाबादच्या दुष्काळी दौऱ्यावर रवाना झाले,``अशी माहिती राष्ट्वादीच्या प्रवक्त्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT