विश्लेषण

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याची राज्याची शिफारस

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी महासंघाच्या मेळाव्यात दिली.

ओबीसींच्या मागण्यांसदर्भात आपण स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे सांगत फडणवीस यांनी ओबीसींना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी  वेगवेगळ्या सामाजिक घटकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यावर अखेर राज्य सरकारने शिक्कामोर्तब करून ही शिफारस केंद्र सरकारकडे गेल्याने या प्रक्रियेतील एक टप्पा आता पूर्ण झाला आहे. 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून सामाजिक क्रांतीची प्रक्रिया गतिमान केली होती. त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचा गौरव करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही  लोकसभेतअधिवेशनात केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT