विश्लेषण

राज्यपाल दयावान, आता सहा महिन्यात समान कार्यक्रम ठरवू : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे अधिक वेळ मागितला मात्र ते फारच दयावान असल्याने त्यांनी आम्हाला 48 तासाऐवजी सहा महिन्याचा वेळ दिला आहे आता आम्ही आघाडीशी शांतपणे चर्चा करू व किमान समान कार्यक्रम ठरवू असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अत्यंत कडक शब्दात त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याबद्दल उपहासात्मक शब्दांत नाराजी व्यक्त केली 

ते म्हणाले, आम्ही कॉंग्रेसशी काल संपर्क केला हे आघाडीच्या नेत्यांनी काल सांगितले आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी आधी संपर्क केला हा आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. राज्यात सरकार स्थापन करणे हा पोरखेळ नाही आम्हाला आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करू आणि सर्व काही नीटपणाने ठरवू. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT