विश्लेषण

घटनादुरुस्तीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्यासाठी ठराव करून तो केंद्राकडे पाठवावा अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे अशी शिवसेनेने भूमिका घेतली आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पहाता मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण खूपच तापले आहे. या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदरांची बैठक आज सकाळी मातोश्रीवर बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. आज दुपारी 4 वाजता शिवसेनेचे नेते व मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT