विश्लेषण

नवे कार्यकर्तेच ठरवतील पक्षात कुणाला घ्यायचे - बाळासाहेब थोरात

सरकारनामा ब्युरो

पुणे : कॉंग्रेसमधून निवडणुकीआधी बाहेर पडलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत आता पक्षातील कार्यकर्तेच निर्णय घेतील असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. ते म्हणाले पक्षाचे जे नेते बाहेर पडले त्यांची जागा पक्षातील नव्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे आता ज्यांना पक्षात यायची इच्छा आहे त्यांना लगेच येता येणार नाही, त्यांच्याबाबत कार्यकर्तेच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

थोरात यांचा संगमनेरमध्ये सत्कार करण्यात आला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, संजय राऊत हे राज्यातील सत्तानाट्याचे मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत. राऊत यांना आम्ही जेव्हा जेव्हा भेटत असू त्याचे लगेच चित्रण होत असे, आम्ही त्यांना दवाखान्यात भेटायला गेलो तेथे एका भिंतीला छिद्र पाडून कॅमेरा लपवलेला दिसला. 

कॉंग्रेसचे आमदार राजस्थानमध्ये होते, त्याकाळातील वास्तव्याबद्दल सांगताना ते म्हणाले तिथे अत्यंत चांगले जेवण होते. पण ते चांगले जेवण काहींना पचले नाही, अनेकांची त्या उत्तम जेवणाने पोटं बिघडली, मग बाजरीची भाकरी आणि ठेचा खाल्यावर बिघडलेली पोटं ठीक झाली असेही त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT