विश्लेषण

मृत्युनंतरही जनतेच्या मनात वाजपेयींचे स्थान 'अटल' : अस्थीकलश यात्रेला हजारोंची गर्दी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या मनता दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान किती अढळ आहे, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. अटलजींचा अस्थी कलश आज हरिद्वारला नेण्यात आला. त्यावेळी यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. कै. वाजपेयी यांनी जे 'अटल' स्थान निर्माण केले त्याचेच ही गर्दी द्योतक होती. 

आज सकाळी नवी दिल्लीतील स्मृतीस्थळ येथून अटलजींच्या कुटुंबियांनी देशाच्या लाडक्या नेत्याच्या अस्थी गोळा केल्या. अटलजींची मानसकन्या नमिता आणि नात निहारिका यांच्यासह अन्य निकटवर्तीय यावेळी उपस्थित होते. सजवलेल्या रथावरुन या अस्थी हरिद्वारला नेण्यात आल्या. या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोक अस्थीकलशावर पुष्पवृष्टी करत होते. अटलजींच्या अस्थी आज हरिद्वार येथे गंगेत विसर्जन केल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्व नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थी विसर्जित केल्या जातील, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. आज निघालेली अस्थीकलश यात्रा सुमारे दोन किलोमीटर लांब होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT