विश्लेषण

तीन पक्षांचे आघाडी सरकार वारिस पठाणवर कारवाई करू शकत नाही - प्रकाश महाजन

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर विधानाच्या विरोधात मनसेने आंदोलन करत वारिस पठाण यांची आज प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली .

यावेळी मनसेने शिवसेनेवर तोंडसुख घेत तीन पक्षांचे सरकार वारिस पठाणवर कारवाई करू शकत नाही असे म्हणत, राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असून आम्ही अशा प्रवृत्तींशी नेटाने लढू असा टोला शिवसेनेला लगावला. शंभर कोटीवर आम्ही पंधरा कोटी भारी ठरू असे वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद मनसेने वारिस पठाण यांची प्रतीकात्मक अंतयात्रा काढून निषेध केला. 

यानिमित्ताने मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेवरही निशाना साधला. वारिस पठाण यांच्या भाषणावर बंदी घालून त्यांना अटक करा अशी मागणी करतानाच, तीन पक्षाच्या सरकारला ते शक्‍य होणार नाही. कारण शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला आहे, त्यांच्याकडून वारिस पठाण यांना अटक होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला. आम्ही त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देखील मनसेने यावेळी दिला. 
खैरेंनी कायम दाढी वाढवावी 
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली. श्रावणामध्ये कायम दाढी वाढवणाऱ्या खैरे यांचा उल्लेख करताना प्रकाश महाजन म्हणाले, खैरे यांनी आता कायमस्वरूपी दाढी वाढवली पाहिजे, आणि मिशी काढून दाढीला मेहंदी लावावी एवढेच काम आता त्यांच्याकडे शिल्लक आहे. धर्मांध आणि जातीयवादी शक्तींना शिवसेना आता रोखू शकत नाही, म्हणूनच राज ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली असून आम्ही या विरोधात लढण्यास सक्षम आहोत असेही प्रकाश महाजन म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT