विश्लेषण

महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश- बिहार होतोय?; शिवसेनेच्या मंत्र्यालाच वाटतेय भीती! 

सरकारनामा ब्युरो

सातारा : आजच्या घडीला राज्याची परिस्थिती खूपच विदारक दिसते. बिहार, उत्तरप्रदेश मध्ये ज्यापद्धतीची परिस्थिती आहे तशी या पुरोगामी महाराष्ट्रात होतेय काय, अशी भीती साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली. 

सातारा नगरपरिषदेने आयोजित केलेल्या हुतात्मा स्मारक नुतनीकरण कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवतारे बोलत होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, आमदार शंभुराज देसाई, नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष सुहास राजेशिर्के, स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, मानसिंगराव शिंदे , पतंगराव फाळके उपस्थित होते. 

शिवतारे म्हणाले, जळगाव जिल्हा जसा केळीचा, नागपूर जसा संत्र्याचा तसा सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे बिरुद खूप अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकाना निधी देवून त्याचे नुतनीकरण करुन त्यात वाचनालय, संरक्षक भिंती, गार्डन ही कामी केली आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT