विश्लेषण

मुलायम आणि मायावती एकत्र येतात मग सेना आणि भाजपने का येऊ नये? : फडणवीस

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुलायमसिंह आणि मायावती हे दोन नेते राजकारणासाठी एकत्र येतात. मग शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती का होऊ नये, असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेशी युती करण्याची आमची भूमिका आहे, असे आज स्पष्ट केले.

एका वृत्तवाहिनिला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध चांगले आहेत. शरद पवार यांना सार्वजनिक कार्यक्रमात भेटतो. तसेच मित्र असलेल्या ठाकरे यांनाही भेटतो. त्या भेटी मिडीयासमोर होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका या वेगळ्या घ्याव्यात, अशी माझी भूमिका आहे. शिवसेना आणि भाजपची युती गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच जागांवरून तुटली होती. या वेळी तसे होऊ नये म्हणून आतापासूनच चर्चा करावी, असे भाजपचे मत आहे. राज्यात २०१९ नंतर मीच मुख्यमंत्रिपदी राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT