विश्लेषण

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी युती तसेच आघाडी होणार का ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी तर पालघर मतदारसंघात चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सत्तेत असूनही एकमेकावर टीका करण्याची संधी न सोडणारे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार का तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार का? याकडे लक्ष लागले असून या पोटनिवडणुकीमुळे युती आणि आघाडीचा प्रश्‍न "दुध का दुध आणि पानी का पानी ' असा सुटणार आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा अशी कोणतीही निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी केली आहे.त्यामुळे शिवसेना या दोन्ही मतदारसंघात उमेदवार देणार का? हा सवाल निर्माण झाला आहे. भाजपाने पाठींबा मागितला तर शिवसेनेची नेमकी कोणती भुमिका राहणार याकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांची युती होणार की नाही, याचे चित्र या पोटनिवडणुकीने स्पष्ट होणार आहे. 

याचबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला पायउतार करण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची भाषा करीत आहेत. या पोट निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार का? हे चित्र देखील स्पष्ट होणार आहे. सध्या कॉंग्रेस पक्षात असलेले नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT