औरंगाबाग जिल्ह्यात अब्दुल सत्तारांचा वावर झाला कमी; सध्या 'वेट अँड वाॅच'ची भूमीका

स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध दंड थोपटुन बंड केल्यानंतर सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांचा लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वावर काहीसा कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी त्यांनी जाहीरपणे सभा घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पक्षाने कारवाईचा बडगा उगारला. सध्या अब्दुल सत्तार यांचे त्यांच्या मतदारसंघावरच सर्वाधिक लक्ष असून लोकसभेचा निकाल काय लागतो, याकडे त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
 औरंगाबाग जिल्ह्यात अब्दुल सत्तारांचा वावर झाला कमी; सध्या 'वेट अँड वाॅच'ची भूमीका

औरंगाबाद : स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध दंड थोपटुन बंड केल्यानंतर सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांचा लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वावर काहीसा कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी त्यांनी जाहीरपणे सभा घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पक्षाने कारवाईचा बडगा उगारला. सध्या अब्दुल सत्तार यांचे त्यांच्या मतदारसंघावरच सर्वाधिक लक्ष असून लोकसभेचा निकाल काय लागतो, याकडे त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. 

आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करुन नंतर माघार घेतली होती. त्यांनी माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांना सोबत घेऊन हर्षवर्धन जाधव यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. इतकेच नव्हे तर त्यांनी ग्रामीण भागात हषर्धन जाधव यांच्या समर्थनार्थ सभाही घेतल्या. यात त्यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार आगपाखड केली होती. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिका केली होती. याची प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दखल घेऊन जालना येथील सभेत अब्दुल सत्तार यांचा कॉंग्रेस पक्षाशी असलेला संबंध संपल्याचे सांगितले होते. 

सिल्लोड-सोयगाव हा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांनी बहुतांश गावात बैठका घेतल्या. तसेच कॉंग्रेसच्या उमेदवाराऐवजी 'नोटा'ला पसंती द्या, असा संदेश आपल्या समर्थकांना दिला होता. आता निवडणुक संपल्यानंतर त्यांचे समर्थक शांत आहेत. शिवाय अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलेले दिसते. त्यांचे लोकसभा निकालाकडे लक्ष असून जिल्ह्यातील त्यांचा वावर काहीसा कमी झाला आहे.

जिल्हा परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार (ता. ७) झालेल्या टंचाई आढावा बैठकीत अब्दुल सत्तार हे दुष्काळ, पीक विमा, कर्जमाफीच्या मुद्यावर अतिशय आक्रमक होते. त्यांनी बैठकीत प्रशासनाला आक्रमपणे धारेवर धरले असले तरी सध्या त्यांचे संपुर्ण लक्ष आपल्याच मतदारसंघावर आहे. मतदासंघातील कार्यक्रम, लग्नसमारंभात ते आवर्जुन हजेरी लावत असले तरी त्यांचा शहर आणि जिल्ह्यातील इतर मतदारसंघात असलेला वावर काहीसा कमी झाला आहे. सध्या शहरात आणि जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या समर्थकांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतांच्या बेरजेवरुन ही सत्तार यांचे वजन किती राहणार हे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com