परतूरः माझ्या शेवटच्या श्वसापर्यंत मी महाराष्ट्रातील शेतकरी व जनतेची अहोरात्र सेवा करने असा शब्द जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला. परतूर येथे आयोजित दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. कॉंग्रेस-महाआघाडीचे सुरेश जेथलिया यांचा त्यांनी पराभव केला. मतदारांनी पुन्हा आपल्यावर विश्वास दाखवल्या बद्दल आभार मानतांनाच त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपण शेतकरी आणि जनतेची सेवा करू अशा विश्वास उपस्थितांना दिला.
लोणीकर म्हणाले, मतदारसंघाचा बराच विकास आपण गेल्या साडेचार वर्षात केला, तुम्ही मला पुन्हा संधी दिल्यामुळे उर्वरित विकासकामे येणाऱ्या पाच वर्षात आपण पुर्ण करू. अनेक नवीन योजना मतदारसंघात आणायच्या आहेत.
शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्न तर करणारच, पण लवकरच नवीन बाजारपेठ उभा करण्याचा माझा मानस आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाची मदत मिळवून देणार असल्याचेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.