औरंगाबादचे मानव विकास आयुक्तालय हलवू नका - लोणीकरांचे मुनगंटीवारांना पत्र 

हे आयुक्तालय औरंगाबाद मधून हालविले गेले तर सत्ताधारी पक्षाच्या एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही. -आमदार अब्दुल सत्तार
Lonikar-Mungantiwar
Lonikar-Mungantiwar

मुंबई :  राज्यातील 12 अतिमागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचविण्यासाठी तयार केलेल्या मानव विकास मिशनचे औरंगाबाद येथील आयुक्तालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे. या बातमीने मराठवाड्यातील राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

आयुक्तालय इतरत्र हालविण्याच्या हालचाली सुरू असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे आयुक्तालय इत्ररत हालवू नये अशी मागणीच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली आहे. अतिमागास जिल्ह्याचा सर्वांगिन विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मानव विकास मिशनचे आयुक्तालय औरंगाबाद याठिकाणी आहे. पण विविध कारणामुळे हे आयुक्तालय इतरत्र वळविण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत.

 पण याबाबत आजून कुठलीही ठोस स्वरूपाची माहिती हाती येत नाही. पण अशा पध्दतीने हे आयुक्तालय औरंगाबाद मधून हालविले गेले तर आक्रमक आंदोलन करू आणि कुठल्याही परस्थिती हे आयुक्तालय औरंगाबादमधून बाहेर जाऊ देणार नसल्याचेही कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगतले. तसेच सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्यातील एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशाराही सत्तार यांनी दिला आहे. 

19 जुलै 2011 रोजी या मिशनची व्याप्ती 22 जिल्ह्यापर्यंत वाढविण्यात आली आहे. औरंगाबाद हे भौगोलिक दृष्ट्या सर्वांसाठी सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात येऊ नये. यामुळे लोकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल असेही लोणीकरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com