तर हिंगोलीत महाजनादेश यात्रा रोखणार; माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांचा इशारा

जिल्ह्यातील बंधाऱ्यांना परवानगी देण्याच्या मागणीस वेळ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा हिंगोलीत रोखणार असल्याचा इशारा माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांनी बुधवारी (ता.२१) 'सरकारनामा'शी बोलताना दिला आहे.
तर हिंगोलीत महाजनादेश यात्रा रोखणार; माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांचा इशारा

हिंगोली : जिल्ह्यातील बंधाऱ्यांना परवानगी देण्याच्या मागणीस वेळ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा हिंगोलीत रोखणार असल्याचा इशारा माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांनी बुधवारी (ता.२१) 'सरकारनामा'शी बोलताना दिला आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुशेषासाठी मागील दहा ते पंधरा  वर्षापासून आंदोलने करण्यात आली आहेत. या अनुशेषामुळे  जिल्ह्यातील शेतीला पाणी उपलब्ध होत नाही परिणामी शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान होत आहे. एकीकडे शेती उत्पादन दुप्पट करण्याची  घोषणा केली जात असतांना दुसरीकडे जिल्ह्यासाठी पाणीच उपलब्ध करून दिले जात नाही ही चुकीची बाब आहे. हिंगोली जिल्हयातील पूर्णा नदीवरील जोडपरळणी, पोटा व पिंपळगावकुटे या तीन बंधाऱ्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

या बंधाऱ्यांसाठी नाशीकच्या जलविज्ञान केंद्राने सन २००६ मधे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देखील दिले आहे. सदर प्रस्तावांची राज्य तांत्रीक सल्लागार समितीकडून तपासणी करून प्रशासकिय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले जाणार होते. मात्र या समितीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र चुकीचे असल्याचे सांगत प्रस्ताव त्रुटीमधे काढून परत पाठविले आहे. समितीच्या या भुमीकेमुळे तीनही बंधाऱ्यांची कामे रद्द करण्याची वेळ आली आहे. 

हिंगोली जिल्हयातील पाण्यावर नांदेडची मंडळी डोळा ठेऊन आहे. हिंगोली जिल्ह्यातील बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळू नये तसेच बंधाऱ्यांच्या कामांवर आक्षेप घेण्याचे काम नांदेडची मंडळी करीत असल्याचा आरोप माजी खासदार ॲड. माने यांनी केला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच बंधाऱ्यांच्या प्रस्तावांमधे त्रुटी काढण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष कसा दूर होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या कामांना मान्यता द्यावी या मागणीसाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची महाजनादेश यात्रा हिंगोलीत रोखली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपण भाजपामधे असलो तरी पक्षाचे काम इमाने इतबारे करणार आहे. मात्र, जिल्ह्याच्या सिंचनाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या कामांनाच प्राधान्य असल्याचे ॲड. माने यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com