`जनतेच्या कर्फ्यू दरम्यान करणार अर्थसंकल्पाचा अभ्यास'

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनानूसार मी रविवारी (ता.22) घराबाहेर पडणार नाही. शासनाच्या नियमानूसार जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी अधिकाधिक चांगल्या तरतुदी कशा करता येतील, यासाठी दिवसभर मी अर्थसंकल्पाचा संपूर्ण अभ्यास करणार आहे.- उत्तम वानखेडे, अध्यक्ष, जालना जिल्हा परिषद
जनता कर्फ्यूमुळे दिवसभर मी अर्थसंकल्पाचा संपूर्ण अभ्यास करणार असल्याचे जालना जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी सांगितले.
जनता कर्फ्यूमुळे दिवसभर मी अर्थसंकल्पाचा संपूर्ण अभ्यास करणार असल्याचे जालना जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी सांगितले.

जालना - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनानूसार मी रविवारी (ता.22) घराबाहेर पडणार नाही. शासनाच्या नियमानूसार जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी अधिकाधिक चांगल्या तरतुदी कशा करता येतील, यासाठी दिवसभर मी अर्थसंकल्पाचा संपूर्ण अभ्यास करणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांनी देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाला हरवण्यासाठी एकजुटी मुकाबला करण्याचे आवाहन करतानाच वानखेडे म्हणाले, जिल्ह्यात दोन दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्‍थापने व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर रविवारी (ता.22) जनता कर्फ्य पाळण्याचे आवाहन पंतप्रधानानी केले आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. तसेच परदेशातून तसेच जिल्ह्याबाहेरून  आलेल्या व्यक्तींचीही तपासणी सुरू आहे. रविवारी पाळण्यात येणाऱ्या जनता कर्फ्यच्या दिवशी मी दिवसभर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. तसेच सोमवारी (ता.23) जिल्हा परिषदेचा वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.  रविवारी या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने सर्व अभ्यास करून त्यात  जनतेच्या हितासाठी अधिकाधिक तरतुदी कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले.  

विविध शहरातून  ग्रामीण भागात परतत असलेल्या व्यक्तींना ग्रामस्‍थ गावात प्रवेश देत नसल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून  आरोग्य केंद्रात त्यांची तपासणी व इतर आवश्‍यक मदत त्यांना मिळवुन देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कोरोना विषाणूचे संकट मोठे असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्‍वास ठेवू नये. रविवारी प्रत्येकाने स्वतःहून जनता कर्फ्य पाळून प्रशासन आणि शासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील उत्तम वानखेडे यांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com