अधिकाऱ्यांनो, वर्षभर थांबा अजितदादा बदला घेतील :  संग्राम कोते  

sangarm-kote.
sangarm-kote.

उदगीर: " राज्यातील सरकारी आधिकारी भाजपाचे पदाधिकारी असल्या सारखे वागत आहेत. पण याद राखा एकच वर्ष शिल्लक आहेत. आमचे सरकार आल्यावर अजितदादा बदला घेतील," असा दम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी भरला. बुधवारी (ता. तीन) येथील रघुकुल मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी युवक काॅग्रेच्या बुध संकल्प युवक मेळाव्यात ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सचिव संजय बनसोडे, अकोल्याचे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे, मधुकर एकुर्केकर, नवनाथ गायकवाड, अजिम दायमी, प्रा. शिवाजी मुळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. कोते-पाटील म्हणाले, " मोठी  जाहीरातबाजी करुन  सत्तेत आलेल्या सरकारने अनेक फसव्या योजनांची घोषणा केली. भिंग लावुन पाहील तरी लाभार्थी सापडत नाहीत. भाजपा शिवसेना हिच बोंडआळी आहे.त्यास नष्ट करावे लागेल  .  पक्षात निव्वळ कार्यकर्त्याची गर्दी असुन चालणार  नाही तर दर्दी  कार्यकर्ते असले पाहीजेत. बुथ कमीट्याच सत्तेचा राजमार्ग आहे. त्यासाठी राज्यात आत्तापर्यत सत्तेचाळीस विधानसभा मतदार संघात मेळावे घेतले आहेत ."

राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चंदन पाटील यांनी प्रास्ताविक प्रविण भोळे यांनी सुञसंचलन अभार गजानन साताळकर यांनी मानले.प्रा. मदन पाटील, पंकज कांबळे, गोविंद भ्रमण्णा, फेरोज शेख यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com