औरंगाबाद : पक्ष कुणाच्या मालकीचा नसतो ती एक प्रकिया असते. मूठभर लोकांचा पक्ष जनसामान्यांपर्यत पोहचवला, पदाशिवाय हे वैभव कमावणे येड्या गाबाल्याचे काम नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
पंकजा म्हणाल्या, ''अजित पवारांनी बंड केल्यावर सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून वाईट वाटले, कारण घर फुटल्याच्या वेदना मी भोगलीय. पण नंतर सगळ्यांचे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर सगळ्यांचे स्वागत करतांना त्या दिसल्या. मुंडे साहेबांना संघर्ष करावा लागला, प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष हे पाहून देवा तू जातीयवादी आहेस का? असा प्रश्न मला विचारावा वाटतो. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सात वंजारा उमेदवार दिले, आणि भाजपने फक्त एक.'' चूक झाली तर कान धरून सांगा ,असे म्हणत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक मी गोपीनाथ गडावर कमळात उभे केले आहे, आता त्या कमळावर बुलडोझर चालवू का?
हा पक्ष माझा आहे, याचा पुनरुच्चार करतांनाच पंकजा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समोरच संताप व्यक्त केला. सत्ता नसताना कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, त्यासाठी मी काम करणार, दरवाजा लावून बसणार नाही, वाघीण आहे, जंगल सोडून जाणार नाही असा विश्वास देखील पंकजा यांनी आपल्या समर्थकांना दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.