अमरिंदरसिंगांना सल्ला देणं मुख्यमंत्री गेहलोतांना पडलं महागात

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांना सल्ला देणे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना महागात पडले आहे.
Amarinder Singh and Ashok Gehlot
Amarinder Singh and Ashok Gehlot File Photo

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) अमरिंदरसिंग (Amarinder Singh) हे मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) पायउतार झाले आहेत. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी अमरिंदरसिंग यांना सल्ला दिला होता. हा सल्ला आता गेहलोत यांना महागात पडला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग नाराज असल्याची चर्चा असून ते वेगळा विचार करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत त्यांच मन वळवण्यासाठी धावून आले होते. त्यांनी ट्विट करून अमरिंदरसिंग हे काँग्रेसला नुकसान होईल, असे पाऊल उचलणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पक्षाने त्यांना साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री केले, असे अमिरिंदरसिंगही मान्य करतात. त्यांना आपल्या सर्वोच्च क्षमतेनुसार काम करत पंजाबच्या जनतेची सेवा केली आहे, असे गेहलोत यांनी म्हटलं होते.

यावर अमरिंदरसिंग हे संतापले आहेत. त्यांना गेहलोत यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे की, त्यांनी आधी त्यांचे राजस्थान पाहावे. पंजाबची चिंता त्यांनी करू नये. पंजाबमध्ये काय करायचे हे आम्हाला माहिती आहे. गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवडणूक समितीनेच मला तिकिट दिले होते. ते चांगले व्यक्ती आहेत. परंतु, त्यांनी त्यांच्यासमोर काय अडचणी आहेत, हे पाहावे. देशात तीन राज्यात काँग्रेस शिल्लक आहे. यात पंजाबमध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू आहे.

गेहलोत यांनी म्हटले होते की, हाय कमांडला अनेकदा आमदार आणि जनतेकडून मिळालेल्या प्रतिसादावर आधारित पक्षाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांची नाराजी ओढवून घेत काँग्रेस अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांची नवड करतात. पण तेच मुख्यमंत्री बदलताना हाय कमांडच्या निर्णयाविरोधात नाराज होत पक्षाला चुकीचे ठरवू लागतात.

देश फॅसिस्ट शक्तींमुळं कोणत्या दिशेनं जात आहे, हा देशवासियांच्या चिंतेचा विषय हवा. त्यामुळे अशावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची देशहितासाठी जबाबदारी वाढते. स्वत:पेक्षा पक्ष आणि देश हिताचा विचार करायला हवा, असं गेहलोत यांनी म्हटलं आहे. कॅप्टन साहेब पक्षातील सन्मानित नेते आहेत. ते पक्षाचे हित लक्षात घेऊनचं पुढेही काम करत राहतील, अशी अपेक्षा असल्याचे गेहलोत यांनी म्हटले होते.

Amarinder Singh and Ashok Gehlot
जोतिरादित्य शिंदेंनी स्वत:चा मास्क दुसऱ्याला वापरायला दिला कारण...

अमरिंदरसिंग यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर बोलताना अमरिंदरसिंग म्हणाले होते की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आमदारांची बैठक बोलावून माझा अपमान करण्याची ही तिसरी वेळ आहे. ते त्यांच्या विश्वासातील व्यक्तीला आता मुख्यमंत्री नेमू शकतात. काँग्रेस अध्यक्षा जो निर्णय घेतील तो चांगला असेल. मी सध्या तरी काँग्रेससोबत आहे. मी समर्थकांशी चर्चा करुन भविष्यातील निर्णय घेईन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com