शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असलेला मंत्रिपुत्र म्हणाला...

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
Ajay Mishra and Ashish Mishra
Ajay Mishra and Ashish Mishra
Published on
Updated on

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्याने काल (ता.3) आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकरी (Farmers) आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अखेर यावर गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांनी खुलासा केला आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घटनास्थळी आपण उपस्थितच नव्हतो, असा दावा केला आहे. मी आणि माझा मुलगा आशिष मिश्रा घटनास्थळी नव्हतो. याचे पुरावे म्हणून माझ्याकडे फोटो आणि व्हिडीओ आहेत, असे मिश्रांनी म्हटले आहे. त्यांचे पुत्र आशिष मिश्रा म्हणाले की, माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो. काही समाजकंटकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल होता. यात आमच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी मी बानबीरपूर येथे होतो. राजकारण करण्यासाठी माझ्आवर आरोप केले जात आहेत.

लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

Ajay Mishra and Ashish Mishra
लखीमपूर खीरी : मृत शेतकऱ्यांना 45 लाख भरपाई, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी अन् घटनेची न्यायिक चौकशी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Ajay Mishra and Ashish Mishra
पराभूत झालेल्या भाजप उमेदवारानं स्वत:लाच घोषित केलं...

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com