लखीमपूर खीरीत आधी कलेक्टर अन् आता एसपींची पडली 'विकेट'

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते.
Lakhimpur Kheri
Lakhimpur KheriSarkarnama

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर लखीमपूर खीरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची (District Collector) बदली झाली होती. आता पोलीस अधीक्षकांचीही (Police Superintendent) उचलबांगडी करण्यात आली आहे.

लखीमपूर खीरीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने जिल्हाधिकारी अरविंद कुमार चौरसिया यांची तडकाफडकी बदली केली होती. ही बदली 28 ऑक्टोबरला झाली होती. त्यांच्या जागी महेंद्र बहादूरसिंह हे नवीन जिल्हाधिकारी आले आहेत. आता लखीमपूर खीरीच्या पोलीस अधीक्षकांचीही उलचबांगडी झाली आहे. राज्य सरकारने पोलीस अधीक्षक विजय धुल यांची बदली केली आहे. त्यांची मुख्यालयात रवानगी झाली असून, त्यांना अद्याप दुसरी नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी संजीव सुमन हे नवीन पोलीस अधीक्षक आले आहेत. धुल हे 2012 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. लखीमपूर खीरी हिंसाचारानंतर महिनाभरातच जिल्हाधिकाऱ्यांनंतर आता पोलीस अधीक्षकांची उलचबांगडी झाली आहे.

Lakhimpur Kheri
आश्रमच्या सेटवर हल्ला करणारा बजरंग दलाचा नेता निघाला खुनातील दोषी

लखीमपूर खीरी येथे 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक झाली आहे. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

Lakhimpur Kheri
काँग्रेसमध्ये जुंपली; सलमान खुर्शीद अन् गुलाम नबी आझाद आमनेसामने

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत. मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com