राजकीय हालचालींना वेग; मोदी राष्ट्रपतींच्या तर भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे.
Punjab BJP leaders meet governor. 

Punjab BJP leaders meet governor. 

Sarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मोदींनी या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. आता काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. आता भाजपने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून, थेट राज्यपालांकडे (Governor) धाव घेतली आहे. याचवेळी मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेतली आहे.

पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप भाजपने केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी ठेवल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. काँग्रेसने मोदींच्या सभेला गर्दी नसल्यानेच त्यांनी दौरा रद्द करून परत जाणे पसंत केले, असे म्हटले आहे. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंजाबमधील घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यांनी सुरक्षेतील त्रुटींबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली आहे.

यानंतर पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांच्यासह इतर नेत्यांनी राजभवनावर धाव घेतली. त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटीबद्दल त्यांनी राज्यपालांना माहिती दिली आहे. यावर आता राज्यपाल काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणी नेमलेली उच्च स्तरीय समिती भाजपने नाकारली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा म्हणाले की, पंजाब सरकारने चौकशीसाठी नेमलेली समिती आम्ही नाकारत आहोत. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती कधीही सत्य शोधू शकणार नाही. कारण या संपूर्ण कटामागील तेच सूत्रधार आहेत.

<div class="paragraphs"><p>Punjab BJP leaders meet governor.&nbsp;</p></div>
कोरोनाचा कहर! देशात संपूर्ण लॉकडाऊनचे चक्र पुन्हा सुरू

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून काल (ता.5) विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला होता. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

<div class="paragraphs"><p>Punjab BJP leaders meet governor.&nbsp;</p></div>
भारतात असुरक्षित वाटत असल्यास पाकिस्तानात जा! कुणाल कामराची गुगली

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पंतप्रधानांनी पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com