कंगनाच्या वक्तव्यावर थरूर म्हणाले, बंदूक घेऊन गोळ्या घालायला जाण्यापेक्षा...

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी कंगनाला खडे बोल सुनावले असून, शहाणपणाचा सल्लाही दिला आहे.
Shahi Tharoor
Shahi Tharoor Sarkarnama

मुंबई : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) चांगलीच वादात सापडली आहे. यावरून तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. या वादावर काँग्रेसचे (Congress) नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी कंगनाला खडे बोल सुनावले असून, शहाणपणाचा सल्लाही दिला आहे.

शशी थरूर यांनी कंगनाचे विधान मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. तिने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर बोलणे हेच हास्यास्पद असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आधी कंगनाने पहिल्यांदा थोडासा इतिहास वाचावा, असे मला वाटते. तिला काही माहिती नाही, हे दुर्दैवी आहे. महात्मा गांधी हे भिकेचा कटोरा घेऊन स्वातंत्र्य मागायला गेले होते, असे तिला वाटत आहे. खरेतर महात्मा गांधी हे अतिशय स्वाभिमानी होते. ब्रिटिशांचे कायदे अन्यायी आहेत, असे जाहीरपणे सांगून ते मोडणारेही पहिले गांधीच होते. तुम्हाला काय शिक्षा करायची ती करा, असे सुनावणारेही गांधीच होते. असे करणे भीक मागण्यासारखे आहे का?

भारताचा स्वातंत्र्यलढा हा अतिशय धैर्याचा आणि नैतिकतेचा होता. कोणतेही शस्त्र न घेता लाला लाजपत राय हे ब्रिटिशांसमोर गेले होते. त्यावेळी झालेल्या लाठीमारात त्यांचा प्राण गेला. अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करून त्यांनी बलिदान दिले. बंदूक घेऊन कुणाला तरी गोळ्या घालून स्वत:ला गोळी घालून घेण्यापेक्षा याला जास्त धैर्य लागते, असेही थरूर यांनी स्पष्ट केले.

Shahi Tharoor
खबरदार! कोरोनाची लस घेतली नसल्यास आता दारूही मिळणार नाही

कंगनाचे टीकाकारांना प्रतिआव्हान

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हे आव्हान दिले आहे. यात तिने 1947 मध्ये कोणते युद्ध झाले, असा सवालही केला आहे. तिने एका पुस्कातील काही उतारेही दिले आहेत. तिने म्हटले आहे की, सगळीकडे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की, 1857 चा लढा हा स्वातंत्र्यलढा होता. याचबरोबर सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरजी यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मला 1875 माहिती आहे पण 1947 मध्ये कोणते युद्ध झाले. कुणी मला याबद्दल ज्ञान दिल्यास मी माझा पद्मश्री परत करेन. याचबरोबर सर्वांचा माफीही मागेन.

Shahi Tharoor
मोदी सरकारच्या अडचणीत वाढ; सुरजेवालांची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

कंगनाविरोधात देशद्रोहाची तक्रार

कंगनाविरोधात आधी मुंबई पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा कंगना मुंबईसह इतर ठिकाणी तिच्या विरोधात तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. तिच्या विरोधात आता आम आदमी पक्षाच्या (AAP) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा मेनन यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. कंगनाने देशद्रोही आणि भावना भडकावणारे वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com