कॉग्रेसमध्ये खांदेपालट सुरु ; तीन प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

''राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या,'' असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updates
Sonia Gandhi News, Congress News, Latest Political News Updatessarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तरांखड, मणिपूर, गोवा या पाच राज्यातील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कॉग्रेस पार्टी आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तीन राज्याच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. (Sonia Gandhi News Updates)

कॉग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi)यांनी या पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धु (Navjot Singh Sidhu)आणि उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल, मणिपुरमध्ये नमेईरकपैम लोकन सिंह यांनी राजीनामा दिला आहे.

पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांना सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्यास सांगितले असल्याची माहिती कॉग्रेसचे नेता रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी टि्वटवरुन मंगळवारी दिली. 'सोनिया गांधी यांनी उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तरांखड, मणिपूर, गोवा या पाच राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यांच्याजागेवर नवीन नियुक्ती होणार आहे,' असे सुरजेवाला यांनी आपल्या टि्वटमध्ये सांगितले आहे.

''राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या,'' असा आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्या असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. कॉग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक रविवारी झाली. या बैठकीत पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यात आले. पाच राज्यात पराभव झाल्यामुळे गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची चर्चा दोन दिवसापासून सोशल मीडियावर सुरु आहे. याबाबत काँग्रेस (congress)पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi)यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

''पक्षाला वाटले तर आम्ही तिघेही राजीनामा द्यायला तयार आहोत,'' असे सोनिया गांधी म्हणाल्या. मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यास नकार दिला आहे. ''काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हाला सर्वांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे,'' असं पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडिया कंपन्यांवर आरोप

सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत दिग्गज सोशल मीडिया कंपन्यांवर आरोप केला. या कंपन्या सरकारशी संगनमत करून सामाजिक एकोपा बिघडवत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. गांधी म्हणाल्या की, फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचा वापर राजकीय पक्षांचे नेते आणि राजकीय पक्षांच्या नॅरेटिव्हला आकार देण्यासाठी केला जात आहे. या प्लॅटफॉर्म्सवर सर्वच पक्षांना समान संधी मिळत नाही. ते आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे.

सोनियांनी फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोप केला की, ते राजकीय पक्षांच्या नॅरेटिव्हला आकार देण्याचे काम करत आहेत. त्या म्हणाल्या की, जागतिक सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत ​​नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com