पंतप्रधान मोदींच्या कथनी अन् करणीत फरक; बिल्कीस बानो प्रकरणावरून काँग्रेसचा घणाघात

Bilkis Bano Case : आमच्यासाठीचा आदर फक्त आता भाषणांपुरताच मर्यादित राहिला आहे काय?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.
Rahul Gandhi, PM Narendra Modi Latest News
Rahul Gandhi, PM Narendra Modi Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची सुटका करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 'अवघा देश हा पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) कथनी आणि करणीमधील फरक पाहतो आहे,' असा टोला काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लगावला. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या संमतीशिवाय दोषींची सुटका होणे शक्य आहे का? असा सवालही काँग्रेसकडून करण्यात आला. (Rahul Gandhi, PM Narendra Modi Latest News)

Rahul Gandhi, PM Narendra Modi Latest News
Vinayak Mete : मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश..

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. "सध्या देशभरातील तमाम महिला एकच सवाल करत आहेत, आमच्यासाठीचा आदर फक्त आता भाषणांपुरताच मर्यादित राहिला आहे काय?" असे त्या विचारत असल्याचे प्रियांका यांनी नमूद केले. राहुल गांधी यांनी हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ज्यांनी पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार करत तिच्या तीन वर्षांच्या मुलीला जीवे मारले. त्या नराधमांची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाचा सुटका करण्यात आली. या सगळ्यातून देशातील महिलांना नेमका काय संदेश दिला जात आहे? पंतप्रधान मोदी बोलतात एक करतात दुसरेच, अशी टीका केली.

प्रियांका गांधी यांनी बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांना तुरुंगातून सोडण्याच्या निर्णयाचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. "एखाद्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या मुलीला ठार मारणाऱ्यांची भाजप सरकार सुटका करत असेल आणि त्या नराधमांचे कॅमेऱ्यासमोर स्वागत होत असेल तर ही अन्याय आणि असंवेदनशीलतेची परिसीमा नाही काय? मोदी हे महिलांचा आदर फक्त भाषणांमध्येच करतात काय?, असा सवाल महिला करत आहेत, असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi, PM Narendra Modi Latest News
केंद्रातील राजकारणात फडणविसांचे पहिले पाऊल : लोकसभेसाठी पुण्यातून चाचपणी

दरम्यान, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची मान्यता आणि संमतीशिवाय गुजरात सरकारने त्यांची सुटका केली असे वाटते का?, अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनीही टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com