रोम जळत असताना तुम्ही व्हायोलिन वाजवू शकत नाही; कमल हसन यांनी मोदींना सुनावले

कृषी कायद्यांच्या विरोधात रान पेटले असून, हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला आता मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.
kamal haasan says narendra modi should have dialogue with farmers
kamal haasan says narendra modi should have dialogue with farmers
Published on
Updated on

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. दरम्यान, या आंदोलनाला मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी पाठिंबा दिला आहे. 
 
केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांची शेतकरी नेत्यांसोबत विज्ञान भवनात  ही चर्चा होत आहे. या चर्चेला पंजाबमधील 30 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या चर्चेतून आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. यानंतर सायंकाळी 7 वाजता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना आणि दिल्लीतील शेतकरी संघटनांशी सरकार चर्चा करणार आहे. 

कमल हसन यांनी म्हटले आहे की, त्यांनी (पंतप्रधान) केवळ माझ्या शेतकऱ्यांकडे पाहावे. तुम्ही दीर्घ काळ त्यांच्याशी चर्चा केली नसून, ती प्रथम करा. देशासाठी चर्चा करणे अतिशय महत्वाचे आहे. देशाच्या हिताचे घडावे यावर तुमचाही विश्वास आहे. कृषी क्षेत्राची आता काळजी घेण्याची गरज आहे. ही माझी विनंती नाही. 

मला व्हायोलिनचा आवाज आवडतो. परंतु, आता ती वेळ नाही. रोम जळत असताना तुम्ही व्हायोलिन वाजवू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी  पक्षीय वाद बाजूला ठेवावेत. शेतकऱ्यांना दिवसेंदिवस पाठिंबा देणारे आवाज वाढत आहेत. अशी परिस्थिती देशाची हिताची असणार नाही. हे आंदोलन चिघळण्याआधी सरकारने तोडगा काढायला हवा, असे हसन यांनी म्हटले आहे. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला होता. काही शेतकरी संघटना बुराडी मैदानावर असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com