

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकारने 'वंदे मातरम्'सह सहा महत्त्वाची विधेयके संसदेत मांडण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी राम मंदिरातील कथित दानपेटी चोरी प्रकरण, पेपरफुटी, इथेनॉल धोरण, सोनम वांगचुक यांचा प्रश्न, शेतकरी आणि कायदा-सुव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोज जनता पार्टी' च्या समर्थकांच्या संसद मोर्चाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आंदोलनकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे जंतर-मंतरपासून संसद भवन परिसरापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या अधिवेशनात केंद्र सरकार विविध क्षेत्रांशी संबंधित सहा विधेयके मांडण्याची तयारी करत आहे. त्यामध्ये 'वंदे मातरम्'शी संबंधित विधेयकासह इतर काही महत्त्वाच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा मानस आहे. या विधेयकांवर संसदेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समाजवादी पक्ष (सपा) या अधिवेशनात अयोध्येतील राम मंदिरातील कथित चढावा चोरीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करणार आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एसआयटी अहवाल सार्वजनिक करण्याची आणि स्वतंत्र उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशीची मागणी संसदेत केली जाणार आहे.
याशिवाय राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पूर्वीपासून कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरही समाजवादी पक्ष सरकारला धारेवर धरणार आहे.
काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत 'काम रोको प्रस्ताव' (Adjournment Motion) दाखल केला आहे. या प्रस्तावाचा उद्देश नव्या पक्षांतरविरोधी (Anti-Defection) कायद्यावर चर्चा घडवून आणणे हा आहे.
तिवारी यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार, सध्याच्या कायद्यात सुधारणा करून केवळ राजकीय स्वार्थासाठी किंवा वैचारिक मतभेदांशिवाय होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पक्षांतराला आळा घालणे आवश्यक आहे. त्याचवेळी संसद आणि विधानमंडळांमध्ये विधायक व प्रामाणिक मतभेद मांडण्याचे स्वातंत्र्यही कायम राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
राम मंदिरातील दान पेटी चोरी प्रकरण
विविध राज्यांतील पेपरफुटीच्या घटना
इथेनॉल धोरण
पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे आंदोलन
शेतकऱ्यांच्या समस्या
बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्था
शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य करण्याचा मुद्दा
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आणि जंतर-मंतर येथील प्रस्तावित आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांनी संसद परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. संसद मार्ग, विजय चौक, जंतर-मंतर आणि आसपासच्या भागात अतिरिक्त पोलीस व निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधक यांच्यात विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.