Raja Bhaiya News : अमित शाहांसोबतच्या बंद दाराआड चर्चेबाबत राजा भैय्यांनी केला खुलासा, म्हणाले...

UP Loksabha Election : कुंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
Raja Bhaiya
Raja BhaiyaSarakarnama

Loksabha Election 2024 :  उत्तर प्रदेशच्या प्रतापगड लोकसभा मतदारसंघात भलेही सहाव्या टप्प्यात मतदान होणार असेल, परंतु या ठिकाणचे राजकारण आतापासूनच तापले आहे. कुंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांनी लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. म्हणजे ते भाजपलाही पाठिंबा देणार नाहीत आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीलाही पाठिंबा देणार नाहीत. मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याच्या आपल्या निर्णयाबाबत राजा भैय्या यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शाहांबरोबर(Amit Shah) झाल्या भेटीबाबतही खुलासा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raja Bhaiya
Raja Bhaiya News: ... अखेर राजा भैय्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत जाहीर केली भूमिका, म्हणाले...

जेव्हा राजा भैय्या यांना विचारलं गेलं की, उत्तर प्रदेशातील प्रतापगड, कौशांबी आणि अमेठीतील काही भागांबाबत अमित शाहांशी तुमचं काय बोलणं झालं? याचे उत्तर देताना राजा भैय्या म्हणाले, जेव्हा चर्चा वन टू वन बंद खोलीत होते, त्या चर्चेचीही एक मर्यादा असते. सर्वकाही चर्चा बाहेर करता येत नाही.

बंद खोलीतील चर्चेबाबत बोलताना राजा भैय्यांनी हेही सांगितले की, जर दोघांशिवाय तिसरा व्यक्ती तिथे हजर असता, तर मानलं गेलं असतं की सूत्र आहेत. मात्र या चर्चेबबात गृहमंत्रीही बोलणार नाहीत आणि आम्हीही आतापर्यंत बोलेलो नाही. मात्र अमित शाहांबरोबरची भेच अविस्मरणीय होती,असंही राजा भैय्यांनी म्हटलं. यादरम्यान बऱ्याच गप्पा झाल्या खूप आपलेपणा, सन्मान मिळाला आणि खूप आनंददायी अनुभव होता. मात्र बंद खोलीतील चर्चा मी बाहेर आणू शकत नाही.

Raja Bhaiya
Akhilesh Yadav News: उत्तर प्रदेश इंडिया आघाडीचेच; अखिलेश यादवांनी आकडाच सांगितला

याचबरोबर अखिलेश यादव यांच्याबाबत त्यांनी म्हटले की, आमचे संबंध कुणाशीही खराब नाहीत. हे खरंय की अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांच्याशी असलेल्या संबंधामध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता, मात्र आता सर्वकाही निवळले आहे आणि तणावपूर्ण संबंध नसेलही पाहिजेत राजकारणात. एनडीए आणि इंडिया आघाडीत थेट लढाई आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com