मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; गृह मंत्रालयानं दाखवलं काँग्रेसकडं बोट

पंतप्रधान मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. पण सुरक्षेतील त्रुटींमुळे हा दौरा रद्द करावा लागला.
PM Narendra Modi

PM Narendra Modi

Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार होते, त्याच मार्गावर आंदोलकांचा मोठा जमाव होता. त्यामुळे पंतप्रधानांना जवळपास 20 मिनिटे एकाच ठिकाणी थांबावे लागले. तसेच पर्यायी मार्गाचीही व्यवस्था नसल्याची माहिती समोर आली आहे.

फिरोझपूरमध्ये पंतप्रधानांकडून आज विविध प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार होते. दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम नियोजित होता. त्यासाठी भाजपने जय्यत तयारीही केली होती. त्याआधी पंतप्रधान मोदी हुसेनवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय़ घेतला. भटिंडा येथून हा मार्ग दोन तासांचा होता.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi</p></div>
पंजाबमध्ये पाऊल पडताच पंतप्रधान मोदींवर ओढवली नामुष्की

पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती गृह विभागाने दिली. शहीद स्मारकापासून 30 किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलनकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले. त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे 20 मिनिटे तिथेच थांबावे लागेल. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह विभागाने स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक आणि प्रवासाचे नियोजन पंजाब सरकारला आधीच कळवले होते. त्यानुसार राज्य सरकारने सुरक्षा व इतर बाबींची योग्य खबरदारी घेणे आवश्यक होते. सरकारने रस्त्यावरील इतर गोष्टी थांबवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवणे अपेक्षित होते. पण तसे करण्यात आले नाही. सुरक्षा व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पुन्हा भटिंडा विमानतळाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>PM Narendra Modi</p></div>
ते मोदींशेजारी बसणार होते पण रस्त्यात असतानाच रिपोर्ट आला अन्...

केंद्रीय गृह मंत्रालयाने याची गंभीर दखल गेतली असून पंजाब सरकारकडून तातडीने अहवाल मागवला आहे. राज्य सरकारला याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना गृह विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, तीन कृषी कायद्यांच्या विरोधी आंदोलनामुळे पंजाबसह इतर काही राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष आहे. त्याचा फटका थेट पंतप्रधान मोदी यांना बसल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी बुधवारी पहिल्यांदाच पंजाबमध्ये पाऊल टाकले होते. पण शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा रस्त्यातच अडवल्याने हा कार्यक्रमच रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे.

पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द करावा लागल्यानंतर भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी काँग्रेस (Congress) सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील पोलिसांना सभेला येण्यापासून रोखण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांशी हातमिळवणी करत मोठ्या संख्येने बस अडकवून ठेवल्या होत्या. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी यातून मार्ग काढण्यास थेट नकार दिला. काँग्रेस सरकारचा हा प्रयत्न लोकशाहीच्या तत्वांना हरताळ फासणारा असल्याची टीका नड्डा यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com