Manipur Violence: मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेत पाच जणांना बेड्या; तपास सुरूच

Manipur Police : मणिपूर पोलिसांनी पाच दोषींना बेड्या ठोकल्या
Manipur Violence
Manipur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Manipur News: मणिपूरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील पाच दोषींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वचक राहण्याची आशा आहे. या घटनेत पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्यांने लक्ष घालून दोषींची गय करणार नाही, असा इशाराच दिला होता. त्यानंतर अॅक्शन मोडवर आलेल्या पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

दोन महिलांना विवस्त्र करून त्यांना रस्त्यावर फिरवण्यात आल्याची दुर्देवी घटना मणिपूरमध्ये घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेचा देशभरात निषेध करण्यात येत असून ठिक-ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. यानंतर मणिपूर पोलिसांनी आणि केंद्रीय सुरक्षा दलाने तब्बल १२६ पेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी केली आहे.

Manipur Violence
Manipur Violence: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल; महिन्याभरात मागवला अहवाल

या घटनेचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही गंभीर दखल घेतली असून मणिपूर सरकारला नोटीस बजावली आहे. एक महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानेही मणिपूर आणि राज्य केंद्र सरकारला फटकारलं होतं.

राज्य आणि केंद्र सरकाराने कारवाई करावी, अन्यथा आम्हला कारवाई करावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर मणिपूर आणि केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घेत तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com