वाराणसी : मशिदींवरील अजानाचे भोंगे उतरवा, अन्यथा त्याच्या समोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळ्याव्यात दिला होता. ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर राज्यभरात एकच गदारोळ उडाला. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली देखील. मात्र पुण्यासारख्या काही ठिकाणी याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर उत्तरसभेत देखील राज ठाकरे यांनी हाच इशारा दिला.
महाराष्ट्रानंतर राज ठाकरेंच्या भोंग्याच्या इशाऱ्याचा आवाज उत्तर-प्रदेशमध्येही पोहचला आहे. वाराणसीमध्ये श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानव्यापी मुक्ती आंदोलनाच्या वतीने घरांवर लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा लावण्यात येत आहे. वाराणसीच्या साकेत नगर परिसरात आंदोलनाचे अध्यक्ष आणि स्थानिक भाजपचे नेते सुधीर सिंह यांनी आपल्या घरापासून याची सुरुवात केली आहे. दररोज अजानच्या वेळी ही हनुमान चालिसा लावण्यात येणार आहे. सध्या दिवसात ५ वेळा हनुमान चालिसा लावली जात आहे.
याशिवाय अलिगढमध्येही या वादाची सुरुवात झाली असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मशिदींमधील अजानच्या भोंग्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या बंदी सोबतच शहरांमधील सर्व चौकांमध्ये लाऊडस्पीकर्सवरती हनुमान चालिसा लावू देण्याची मागणी केली आहे. यासाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी देणगी गोळा करत शहरातील २१ चौकांमध्ये हनुमान चालिसा लावण्याची परवानगी देखील मागितली आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने ही परवानगी नाकारण्यात आली आहे. पण अभाविपचे कार्यकर्ते ही मोहिम पुढे घेवून जाण्यावर ठाम आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.