अमरिंदरसिंग बंड करणार; विधानसभेच्या निवडणुकीत उचलणार मोठं पाऊल

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.
Amarinder Singh
Amarinder SinghSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर तीन दिवसांत त्यांनी थेट गांधी कुटुंबावरच हल्लाबोल केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनाही त्यांनी थेट इशारा दिला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सिध्दू यांच्या विरोधात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी मनातील खदखद व्यक्त करीत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू आहे. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. नवे मुख्यमंत्रीही सिध्दू यांच्या गोटातील असल्यानं अमरिंदरसिंग दुखावल्याचे बोलले जात आहे.

Amarinder Singh
कॅप्टन अमरिंदरसिंगांनी आता थेट गांधी कुटुंबावरच डागली तोफ

याच नाराजीतून त्यांनी बुधवारी विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये गांधी कुटूंबावर निशाणा साधण्याबरोबरच पक्षालाही उघडपणे इशारा दिला आहे. सिध्दू यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी कोणतंही बलिदान देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सिध्दू यांच्याविरोधात उमेदवार उभा करू, असं त्यांनी म्हटलं आहे. सिध्दू यांच्यासारख्या खतरनाक व्यक्तीपासून देशाला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू. सिध्दू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला निवडणुकीत दहा जागाही मिळणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अमरिंदरसिंग यांनी उघडपणे ही भूमिका मांडल्यानं काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असल्याची चर्चा आहे. अमरिंदरसिंग यांना मानणारा मोठा वर्ग पंजाबमध्ये आहे. विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी बंड करण्याचे संकेत दिल्यानं पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. आता अमरिंदरसिंग हे केवळ सिध्दू यांच्याविरोधात जाणार की पक्षच सोडून काँग्रेसला अडचणीत आणणार, याबाबत त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही.

Amarinder Singh
नव्या मुख्यमंत्र्यांसह सिध्दू दिल्लीत; अमरिंदरसिंग यांना पुन्हा धक्का देण्याची तयारी

दरम्यान, एका मुलाखतीत बोलताना अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटूंबावरच टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अनुभव नसून, दोघेही दिशाभूल झालेले आहेत, अशी टीका अमरिंदरसिंग यांनी केली आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग यांनी थेट गांधी कुटुंबावर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते लवकरच काँग्रेस सोडतील, या शक्यतेला आता बळ मिळू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com