`आमदार भालके, कल्याण काळेंनी पक्षांतरावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत`

`आमदार भालके, कल्याण काळेंनी पक्षांतरावर बोलण्याऐवजी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत`

पंढरपूर : सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे आणि आमदार भारत भालके यांनी दलबदलूपणाचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा शेतकरी आणि कामगारांचे थकीत पैसे द्यावेत, अशी टिका कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी केले आहे.

 कल्याणराव काळे यांच्यावर दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काळेंच्या कारखान्यांची आर्थिक कोंडी झाल्यामुळे ते भाजपात गेल्याचा आरोप केला होता.

या आरोपावर काळेंनी स्पष्टीकरण देताना पवार यांचे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. परंतु काळेंच्या मालकीचा असणाऱ्या खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याने 2018-19 सालामध्ये गळीतास आलेल्या ऊसाचे अद्यापपर्यंत एक रुपयाही बिल संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले नाही. तसेच सदर ऊसाची एफआरपीसुद्धा देण्यात आलेली नाही, असा दावा पाटील यांनी केला.

सहकार शिरोमणी कारखान्याच्या संदर्भाने सुद्धा अनेक बाबींमध्ये अनियमीतता आहे. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असे पाटील म्हणाले. 

श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार भारत भालकेंनी सुद्धा त्यांच्या दलबदलूपणाबद्दल स्पष्टीकरण देण्यापेक्षा कारखान्यातील कामगारांचे थकलेले पगार व रिटेशनची रक्कम आधी द्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे काळे-भालके येवढेच स्वच्छ असतील तर त्यांनी त्रयस्थ संस्थेमार्फत आपआपल्या ताब्यातील साखर कारखान्यांचे लेखापरिक्षण करण्याची तयारी दर्शवावी, असे आव्हान अमरजित पाटील यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com