सांगली : लोकसभा निवडणुकीवेळी भाजप त्याग करून वंचित विकास आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा 'वंचित'चा त्याग केला. आज त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली नाही मात्र त्यांनी दोन दिवसात कार्यकर्त्यांचे व धनगर समाजातील नेत्यांचे मत ऐकून घेऊन पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले,"धनगर समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करावा यासाठीचा माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. तथापि हे आरक्षण भाजपच देऊ शकतो असे मला जाणवले. तथापि वंचित विकास आघाडीत राहून मला हे आरक्षण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या आघाडीचे काम थांबवले आहे. गेल्या दोन महिन्यापासून मी वंचितच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी नव्हतो.''
ते पुढे म्हणाले, ''माझी नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही. मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. मला लोकसभेला तीन लाखांवर मते देणाऱ्या सर्व मतदारांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र, माझा लढा धनगर आरक्षणासाठी असल्याने मी पुढील निर्णय घ्यावा असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. त्यामुळे मी आता आघाडी सोडण्याची निर्णय घेतला आहे.'' पडळकर यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप प्रवेशाबद्दल थेट भाष्य केले नाही मात्र त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याबाबतही त्यांनी भाष्य टाळले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.