

जयसिंगपूर (कोल्हापूर) : सदाभाऊ खोत यांनी जाहीर केल्याप्रमाणे, उसाला पहिली उचल विनाकपात 3575 रूपये दर देण्यास कारखानदारांना भाग पाडल्यास त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये सन्मानाने परत घेऊ असा टोला स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक यांनी लगावला.
नुकतेच सदाभाऊ खोत यांनी कसबे डिग्रज येथीस सभेत यासंबंधी वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना सावकर मादनाईक म्हणाले की, आम्हाला प्रत्येक वर्षी शेतकर्यांच्या ऊस दर मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. गतवर्षी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकर्यांना एफआरपी दिलेली नाही. जवळपास 465 कोटी रूपयांची एफआरपी थकीत आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचे केवळ कागदी घोडे नाचवले आहेत. गेल्यावर्षी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच एफआरपी + 200 तोडगा काढलेला होता. त्याप्रमाणे किती साखर कारखान्यांनी दर दिला हे सरकारने सांगावे. सदाभाऊ खोत यांनी उसाला पहिली उचल जेवढी जाहीर केली आहे, तेवढा तर त्यांनी साखर कारखान्यांना देण्यास भाग पाडावे. संघर्षाशिवाय उसाला दर मिऴत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू. पहिली उचल विनाकपात 3575 रू. दिल्यास सदाभाऊंचा त्याच ऊस परिषदेच्या मैदानात सत्कार परिषद घेऊन पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनमध्ये सन्मानाने प्रवेश देऊ, असे मादनाईक यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.