

कंत्राटीकरण, पीपीपी तत्त्वावर मालमत्तांचा पुनर्विकासाला विरोध करत उद्यापासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी उद्यापासूनच संपाचा निर्णय घेतला आहे. यामुळे वीज आणि बससेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. मात्र, जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून राज्य सरकारने 'अत्यावश्यक सेवा कायदा' लागू करत संपावर बंदी घातली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. अशातच अवघ्या चार दिवसांत त्यांचे तब्बल 6 हजार फेसबुक फॉलोअर्स घटले आहेत. सध्या सोशल मीडियावर ओमराजेंना जोरदार ट्रोल केले जात आहे
ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना धोका आहे असल्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाने वर्तवली आहे. गुप्तवार्ता विभागाकडून स्थानिक पातळीवर Y+ दर्जाच्या सुरक्षेसमान बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचा संदेश सहाही खासदारांना देण्यात आले आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे 16 मतांनी सुरुवात केली होती. पण 22 तारखेला आमचा विजय होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील अदृश्य शक्ती आमच्या सोबत होती. अदृश्य शक्तीने आम्हाला साथ दिल्याचा दावा देखील मोहिते पाटलांनी केला. 22 तारखेला मतदानाची आकडेवारी तुम्हाला समजेल. या दुष्काळमध्ये वसंत बहरेल अस मोहिते पाटील म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात ९८.९०% मतदान झाले. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील एकूण १३ मतदान केंद्रांवर आज सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ६३७ मतदारांपैकी ६३० मतदारांनी मतदान केले. यामध्ये ३०८ महिला तर ३२२ पुरुष सदस्य मतदान केले. ४ वाजता मतदान संपल्यानंतर मतपेट्या या मतमोजणी केंद्रातील स्त्रोंग रूमकडे पाठवण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंकडून बैठकांचे आयोजन केले जात आहे. शुक्रवारी ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा बंडखोर खासदारांना राजस्थानमध्ये सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यासाठी अतिरिक्त १० कोटी रुपये दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी सहा बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलात, आता राजीनामा द्या. त्यांच्या पक्षातून निवडणूक लढवा. टायगर कधी लपत नाहीत, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. आता आमचं ऑपरेशन तुडवा असेल, असा सूचक इशाराही राऊतांनी बंडखोर खासदारांना दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंड केले आहे. त्यापैकी एक असलेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पुण्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शिवसैनिकांकडून आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने हा बंदोबस्त वाढविण्यात आल्याचे समजते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 जून रोजी मुंबईत मोठा मेळावा होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिका, संघटन बळकटीकरण आणि आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असून, महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा होण्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबईतील मंत्रालय परिसरात एका शेतकऱ्याने आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. संबंधित शेतकरी झाडावर चढल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्काळ दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
खासदार संजय जाधव यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश जारी केले आहेत. ते परभणीत दाखल होताच पोलीस प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था तात्काळ लागू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रेफेक्टरी) चालविणाऱ्या मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेसचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. 'एफडीए' चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर (एमओयू) औपचारिकपणे स्वाक्षरी केल्याची माहिती दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अमरावती शहर काँग्रेसने अमरावती विधानपरिषद निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेचे 17 ही नगरसेवकांना निवडणुकीमध्ये मतदान करणार नाहीत. कारण काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना तसा व्हीप जारी करून आदेश दिले आहेत.
भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे निवडणुका जिंकू शकत नसल्यानेच देशात लोकशाही धोक्यात आली असून केंद्र सरकार विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून पक्ष फोडण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केला आहे.
विधानपरिषदेच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या ठिकाणच्या जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर या मतदानाचा निकाल 22 जून रोजी जाहीर केला जाणार आहे.
राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर एकूण 11पैकी तब्बल सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.