Aditya thackeray : 'खेचून, रडून, ओढून-ताणून..!', आदित्य ठाकरेंनी शिंदेंसह भाजप कार्यकर्त्यांची उडवली खिल्ली

Aditya thackeray on Eknath Shinde Shiv sainik : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला
Aditya thackeray
Aditya thackeraySarkarnama
Published on
Updated on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसैनिकांवर पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. 'ओढून-ताणून मिंधेंनी ३ गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं. मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, पण ज्यांच्यावर विश्वास ठेवून पळालात त्यांनीच विश्वासघात केला.' असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंनी महामंडळाचे वाटप केलं होतं. त्यामध्ये काही नेत्यांच्या नियुक्त्या मंत्रि‍पदाचा दर्जा असलेल्या पदांवर केल्या. या विषयावर बोट ठेवत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

'शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या आमदारांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं! आहे, या विषयावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे.

Aditya thackeray
One Nation One Election : काय होती इंदिरा गांधींची रणनीती? मोदींना ती भीती नाही का?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (Aditya Thackeray) युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. गुरुवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, 'खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी ३ गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं... ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं!. कौतुक आहे ह्यांचं... काय स्वप्नं घेऊन पळाले होते! एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर असाच विश्वासघात होतो!' असा घणाघात त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.

'बरं हे होताना अजून कौतुक वाटतं ते भाजपा कार्यकर्त्यांचं... 2 वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठच्या खऱ्या भाजपा (BJP) कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधे नी परस्पर पद देऊन टाकली... ह्यांचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपाला काय मिळालं?,' असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com