Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येला दोन महिने, ठाकरेंच्या शिलेदाराने 'हे' पाच प्रश्न विचारून सरकारची केली कोंडी

Ambadas Danve five questions to government : संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने होत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाल्याने ट्विट करत सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. विष्ण चाटे हा आरोपी दोन महिन्यांनंतर देखील फरार आहे. या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावरून सरकारला घेरण्यात येत आहे. त्यामध्ये आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाल्याने ट्विट करत सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.

कृष्णा आंधळे हा आरोपी अजून धरला गेलेला नाही. त्याच्या मुसक्या कधी अवळणार? आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना परत सीआयडीने आपल्या कोठडीत घेऊन तपास चालवला होता. त्यात काय डेटा रिकव्हर झाला ते लोकांना कधी कळणार? विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी नियुक्ती करण्याची मागणी समोर आली होती. त्यांच्या या नियुक्तीचे चार ओळींचे पत्र काढायला सरकारला अजून किती महिने लागणार?, असे पहिले तीन प्रश्न दानवे यांनी विचारले आहेत.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे उभ्या जगाला ज्ञात आहे. मग यांच्या संबंधांची तपासणी कधी होणार? असा चौथा प्रश्न दानवे यांनी विचारला आहे. तर दरदिवशी नवे घोटाळे समोर येत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार? की ती ताकद मुख्यमंत्र्यांच्या बाहुत नाही? असे पाचवा प्रश्न दानवेंनी विचारल आहे.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणी करत त्यांचा राजीनामा घेण्याची ताकद मुख्यमंत्रींच्यायांच्या बाहुत नाही? असा प्रश्न करत थेट देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नी टार्गेट केले आहे. अंजली दमानिया यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या निमित्ताने मुख्यमंत्री हे विरोधकांच्या टार्गेटवर येत आहेत.

मुंडेंच्या राजीनाम्यावर ठाम

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन दोन महिने पूर्ण झाले. आज तरी राजीनामा होणार का ? आज स्व संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक धनंजय मुंडे यांच्यावरचे सगळे आरोप मी पुरव्या सकट मी मुख्यमंत्री, लोकायुक्त,अजित पवार, इलेक्शन कमिशन, सीबीआय, सीएजी आणि एसीबी यांना ला पाठवत आहे. जो पर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे तो पर्यंत दबाव राहणार. त्यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, असे म्हटले आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Mahayuti Politics : अजितदादांना त्यांच्या पत्नीला अन् मुलाला कुठं निवडून आणता आलं; काय गप्पा मारता, भाजप नेत्याचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com