
अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांना काळे झेंडे दाखवण्याच इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारच्या शहराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या घरातच पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.
आंदोलनाचा चौथा दिवशी बच्चू कडू यांचं वजन 2 किलोंनी घटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी बच्चू कडू यांनी काल (मंगळवारी) फोन केला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज कडू यांची भेट घेणार आहेत.
काल जिल्हाधिकाऱ्यांनी कडू यांची भेट घेतली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या फोनवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणं करुन दिले. पण बावनकुळे यांची भाषा आपल्याला समजली नाही, असे कडू म्हणाले.
बावनकुळे यांची भाषा मला बरोबर वाटली नाही. जिल्हाधिकारी आलेले आहेत तर तुम्ही उपोषण सोडून घ्या, नंतर या विषयावर आम्ही मीटिंग लावू, असं बावनकुळे म्हणाले. पण ही तानाशाहीची भाषा होती, अशा शब्दात बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.