हायड्रोजन बाँम्ब : मुख्यमंत्री काळात फडणवीसांचा खोट्या नोटांच्या रॅकेटना आशीर्वाद

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नोटबंदीनंतर जवळपास वर्षभर महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नव्हते.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नोटबंदीनंतर जवळपास वर्षभर महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नव्हते. त्याचे कारण बनावट नोटांचा हा सगळा खेळ फडणवीसांच्याच आशीर्वादाने चालायचा. तसेच बनावट नोटांशी संबंधित प्रकरणे फडणवीसांनी समीर वानखेडेंच्या मदतीने दाबली असे अनेक आरोप करत महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हायड्रोजन बाँम्ब फोडला आहे.

काल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी केली असून त्यांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर मलिकांनी हे आरोप फेटाळत हा बाँम्ब फुसका असल्याचे सांगत आपण हायड्रोजन बाँम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज हा हायड्रोजन बाँम्ब फोडला आहे.

Nawab Malik
मलिकांच्या पत्रकार परिषदांना वैतागल्या अमृता फडणवीस म्हणाल्या, बिगड़े नवाब ने...

नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि समीर वानखेडेंचे जुने संबंध आहेत. सोबतच फडणवीस इतरांवर आरोप करतात की तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे, पण फडणवीसांना विचारु इच्छितो की गुन्हेगार लोक आहेत त्यांना सरकारी महामंडळांचे अध्यक्ष का बनवले? नागपूरचा गुंड मुन्ना यादव याला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष का बनवले? हैदर आजम याला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष का बनवले? असा सवाल केला आहे.

हैदर आजम हा बांगलादेशातील लोकांना मुंबईत आणून स्थायिक करण्याचे काम करत नाही का? आझमची दुसरी पत्नी बांगलादेशी आहे. तिची मालाड पोलिसांनी चौकशी सुरु केली. बंगाल पोलिसांनी तिची कागदपत्र बनावट असल्याचे सांगितल्यानंतर मालाड पोलिसांनी खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप मलिकांनी केला आहे.

Nawab Malik
"फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी महामंडळांच्या अध्यक्षपदी बसवले

ते पुढे हायड्रोजन बाँम्ब फोडताना मलिक म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्रात वसूलीचे काम जोरात चालायचे. तसेच महाराष्ट्रात बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्याच आशीर्वादाने चालायचा. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की दहशतवाद संपवण्यासाठी, खोट्या नोटा संपवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याप्रमाणे या काळात पंजाब, मध्यप्रदेशमध्ये खोट्या नोट्या पकडण्यात आल्या.

पण महाराष्ट्रात ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत खोट्या नोटेचे एकही प्रकरण महाराष्ट्रात उघडकीस आले नाही. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी पहिले प्रकरण उघडकीस आले. यात १४ कोटी ५६ लाख रुपये जप्त करण्यात आले. यात काहींना अटक झाली, पण ८ लाख ८० हजार सांगत प्रकरण दाबण्यात आले. ,तसेच बनावट नोटा भारतात चालण्यासाठी तत्कालिन सरकारचे अभय होते, असा आरोप करत मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हायड्रोजन बाँम्ब टाकला.

नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांच्याशी संबंधित असल्याचे आरोप करत फडणवीसांना सवाल केला आहे. रियाज भाटी कोण होता, ज्याला दोन पासपोर्टसह पकडला होता. तो भाजपच्या कार्यक्रमात कसा असायचा? पंतप्रधान मुंबईत आले तेव्हा रियाज भाटी याने त्यांच्याबरोबर फोटो काढला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सगळी चौकशी करून प्रवेश दिला जातो, पण इथे रियाज भाटीला प्रवेश कसा दिला जातो?

रियाज भाटी अंडरवर्ल्डचा माणूस, दाऊदशी संबंधीत माणूस होता. तो फरार आहे, त्याला फडणवीसांनी आपल्या जवळ का ठेवले होते. फडणवीस यांनी सगळ्या क्रिमिनल लोकांना पदावर बसवले, खोट्या नोटांचे रॅकेट चालवणार्‍यांना पदे दिली. तसेच खोट्या नोटांच्या प्रकरणाचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे, तेव्हा ते डीआरआयला होते. खोट्या नोटांची कारवाई केली तेव्हा वानखडे यांच्या मदतीने फडणवीसांनी हे प्रकरण दाबले होते, असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com