अजित पवारांनी राज्यपालांना करुन दिली परंपरेची आठवण...

Governor vs Government : राज्यपाल विरुद्ध-ठाकरे सरकार अशी पुन्हा एकदा ठिणगी
Ajit Pawar, Bhagat Singh KoshyariGovernor vs Government

Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari

Governor vs Government

sarkarnama

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना परंपरेची आठवण करुन दिली आहे. राज्यपालांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे सध्या राज्यपाल विरुद्ध-ठाकरे सरकार (Governor vs Government) अशी पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यपालांना परंपरेची आठवण करुन दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेत सध्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Assembly President Election) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी अर्ज भरायचे आहेत. मात्र सध्या राज्यपालांनी अजूनही या निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल दिलेला नसल्याने हा निवडणूक कार्यक्रम केवळ कागदोपत्री राहणार का? असा सवाल विचारला जात आहे. महाविकास आघाडी सरकारने २३ डिसेंबर रोजी राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळविले आहे, पण त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आल्यानंतरच सभागृहाच्या दैनंदिन कामकाजात या निवडणूक कार्यक्रमाचा समावेश होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari</p><p>Governor vs Government</p></div>
राज्यपालांनी असे उत्तर दिले की महाविकास आघाडीचे नेते चाट पडले...

राज्यपालांच्या या भूमिकेबाबत जेव्हा अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता ते म्हणाले, मी त्यांना विनंती करतोय लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या परंपरांचे पालन जे राज्यकर्ते असतात त्यांनीही करायला हवे आणि राज्यकर्त्यांच्या वरचे जे प्रमुख असतात त्यांनीही करायला हवे असे आमचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांचा रोख अप्रत्यक्षरित्या एक प्रकारे सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांना राज्यपालांनी लवकरात लवकर मंजूरी द्यावी याच परंपरेकडे असल्याचे सांगितले जाते.

<div class="paragraphs"><p>Ajit Pawar, Bhagat Singh Koshyari</p><p>Governor vs Government</p></div>
Obc Reservation : भाजपचं राज्य अडचणीत येताच केंद्राला जाग; उचलंल मोठं पाऊल...

राज्यपालांकडून ग्रीन सिग्नल आणण्याची जबाबदारी तीन बड्या नेत्यांवर :

राज्यपालांकडून या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल आणण्याची जबाबदारी तीन बड्या नेत्यांवर सोपवण्यात आली होते. शिवसेना विधिमंडळ गट नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), काँग्रेस विधिमंडळ गटनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावरही गेले होते. यावेळी भेटीनंतर राज्यपालांना काही माहिती घ्यायची आहे, काही अभ्यास करायचा आहे. त्याबाबत त्यांना काही लोकांचा सल्लाही घ्यायचा आहे, तो घेवून ते कळवतो म्हणाले असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com