नारायण राणेंनी रत्नागिरीचा वचपा सिंधुदुर्गात काढला

भाजपच्या (BJP) सिद्धिविनायक पॅनेलचे ११ उमेदवार निवडून आले आहेत.
Narayan Rane

Narayan Rane

sarkarnama

सिंधुदुर्ग : रत्नागिरी जिल्हा बॅंकेत (Ratnagiri District Bank) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पराभवाचा धक्का बसला होता. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत (Sindhudurg district bank election) राणे यांच्या नेतृत्वात असलेल्या भाजपच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवत रत्नागिरी जिल्हा बॅंक निवडणुकीचा वचपा काढला आहे. भाजपच्या (BJP) सिद्धिविनायक पॅनेलचे ११ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली होती. त्यांनी तब्बल १९ जागा जिंकत भाजपचा पराभव केला होता. शिवसेना नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलन होते. तर निलेश राणे यांच्या नेतृत्वात भाजपचे पॅनल होत. त्यामध्ये भाजच्या पॅनला सुपडा साफ झाला होता.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane</p></div>
जिल्हा बँकेच्या विजयावर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया अन् नवीन वादाला निमंत्रण

एकूण 21 जागांपैकी १९ जागांवर सामंत आणि तानाजी चौरगे समर्थकांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे कोकणातील प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राणेंच्या समर्थकांना पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यामुळे रत्नागिरीतील पराभवाचा वचपा राणे सिंधुदुर्गत काढणार काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत राणे यांना धक्का देण्यासाठी जोरदार तयारी केली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष व शिवसेना नेते सतिश सावंत यांच्या खांद्यावर होता. मात्र, सतिश सावंत यांनाच पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे राणे यांना अडचणीत आण्याच्या आघाडीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.

<div class="paragraphs"><p>Narayan Rane</p></div>
बँकेवर झेंडा फडकावताच गायब नितेश राणे प्रकटले अन् म्हणाले, गाडलाच...

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यामुळे ही निवडणूक अधिक गाजली. मात्र, सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. दुसरीकडे भाजपचे वर्चस्व असले तरी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com